• Home
  • Sample Page
Today Maharashtra
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Today Maharashtra
No Result
View All Result

राज्यातील वसतिगृहे पुन्हा सुरु होणार

Today महाराष्ट्र by Today महाराष्ट्र
January 21, 2022
in शैक्षणिक
0
राज्यातील वसतिगृहे पुन्हा सुरु होणार

 

मुंबईः राज्याच्या  शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सामाजिक न्याय विभागानेसुद्धा कोविडच्या नियमांचे पालन करून वसतिगृहे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्विविट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 

कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढल्यानंतर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सामाजिक न्याय विभागची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने सामाजिक न्याय विभागाने वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ही वसतिगृहे सुरू करताना त्या त्या जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन व स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करून, योग्य ती काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे.

 

कोरोना परिस्थिती अटोक्यात

 

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाच्या नियमानुसार सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कोविडची परिस्थिती अटोक्यात आल्यानंतर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आता शाळांपाठोपाठ वसतिगृहेही सुरू करण्याचा आदेश धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

 

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींची सामना करावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणित नुकसान होत होते. यासाठी सामाजिक न्याय विभागाची ही वसतिगृहे कोरोनाच्या नियमांचे पालन करून वसतिगृहे चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ही वसतिगृहे आहेत त्या जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन व वसतिगृहांच्या समन्वयाने ही विद्यार्थी वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लाभ होणार आहे.

 

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या वसतिगृहामध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाशिवाय शहरात थांबण्याचा आधार नव्हता त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न मिठणार आहे.

Previous Post

पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी, आता पेन्शन मिळणार महिन्याच्या शेवटच्या तारखेला

Next Post

 दहा वर्षांपासून बुडविलेला पाणीपट्टीचा कर अन् थकबाकी  पोहचली २४ कोटींच्या वर.

Next Post
 दहा वर्षांपासून बुडविलेला पाणीपट्टीचा कर अन् थकबाकी  पोहचली २४ कोटींच्या वर.

 दहा वर्षांपासून बुडविलेला पाणीपट्टीचा कर अन् थकबाकी  पोहचली २४ कोटींच्या वर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!
जळगाव

‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

" ऐसी कळवळ्याची जाती करी लाभेविण प्रीती" संतांच्या या उक्तीप्रमाणे जगणारे अनेक लोक आहेत. कृषी विभागातून निवृत्तीनंतर खरंतर पांडुरंग अण्णांना...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन
जळगाव

भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन

सुरक्षेच्या दृष्टीने भादली-भुसावळदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, वीजखांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना
जळगाव

शाळेची संरक्षक भिंत पडून बालकाचा मृत्यू; नशिराबादची घटना

नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.याबाबत...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती
जळगाव

14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

शासनाने जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून...

by Today महाराष्ट्र
April 1, 2023
  • Home
  • Sample Page

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group