प्रतिनिधी/पाळधी
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे 29 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक राजू बागुल विरुद्ध वैशाली किरण यांचा भीम गीतांचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच जळगाव जिल्हा आंबेडकरी समाजाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आल्यानंतर भीमगीतांच्या कार्यक्रमास सुरवात झाली. राजू बागुल व वैशाली किरण यांनी आपल्या गायनातून प्रबोधन केले त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली. या कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव शामराव नन्नवरे यांनी केले होते.
कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, ऍड.राजेश झाल्टे जी.प सदस्य प्रतापराव पाटील, नगरसेवक सुरेश सोनवणे, शालीक गायकवाड, दिलीप सपकाळे, संजय सपकाळे, शिवसेनेच्या जळगाव उपशहर प्रमुखं सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलु ताई इंगळे, शांताराम खैरे, वसंत सपकाळे,मिलिंद सोनवणे, यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाब कांबळे, अनुप पानपाटील, हाफिज खान, मिलिंद हीरोळे, रवी इंगोले, यांनी परिश्रम घेतले.