चाळीसगाव- मुलं चोरणारी महिला समजून एका निराधार महिलेला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी चाळीसगाव शहरातील सदानंद चौकात घटना घडली आहे.
चाळीसगाव शहरातील सदानंद चौकात तोंडाला रुमाल बांधलेली एक महिला फिरत होती. त्या महिलेने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने नागरिकांनी त्या महिलेवर मुलं चोरत असल्याचा संशय घेतला. तसेच याच संशयावरुन नागरिकांनी तिला मारहाण केली. त्या महिलेचं नागरिकांनी काही एक ऐकून न घेता जोड्या आणि चपलांनी मारहाण केली.अतसेच महिलेला पोलीस ठाण्यात नेत पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता, महिलेची चौकशी केली असता, ती महिला खंडवा येथील असून तिचे कुणीही नातेवाईक आहे, मिळेल त्या ठिकाणी मिळेल ते काम करुन करुन महिला तिचा उदरनिर्वाह भागवते, अशी माहिती समोर आली आहे. त्या महिलेचा चेहरा पूर्णतः जळलेला होता यामुळे तिने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र नागरिकांनी घटनेची खातरजमा न करता कायदा हातात घेत महिलेला मारहाण केली. पोलिसांनी त्या महिलेची चौकशी करून त्या महिलेला जळगाव येथील आशादीप या शासकीय वसतीगृहात दाखल केले आहे. अशी माहिती पोलीस निरिक्षिक के.के.पाटील यांनी दिली आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे मॅसेज सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. चाळीसगाव शहर पोलिसांकडून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे अशी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता थेट पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांन कडून करण्यात आले आहे.